देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 9 हजार पार; आतापर्यंत 308 लोकांचा मृत्यू


नवी दिल्ली : संपूर्ण देश कोरोनाच्या संकटापुढे हतबल झाला असून देशभरात सध्या लॉकडाऊन असूनही कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 9152 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 308 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 9152 कोरोना बाधित आहेत. तर 764 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील 24 तासात कोरोनाबाबत समोर आलेली सर्व माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत सादर केली. देशभरात गेल्या 24 तासात 34 रुग्णांचा बळी कोरोनाने घेतला असून देशात आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 308 रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि 9152 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर जगभरात एक लाखाहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित संक्रमित रुग्णांची जगातील संख्या 16 लाखांहून अधिक आहे. चीन, इटली, अमेरिका आणि स्पेनमध्ये कोरोनाचा सर्वाधित प्रभाव आहे.

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 909 नवीन कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. तर आतापर्यंत 308 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात 80 टक्के रूग्ण कमी लक्षणे असणारे आहेत. मागील 24 तासांमध्ये 34 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 20 टक्के रूग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. लव अग्रवाल यांनी सांगितले की, 9 एप्रिलच्या आकडेवारीनुसार, जर 1100 बेडची आवश्यकता होती, तर आता 85,000 बेड्स उपलब्ध आहेत. सध्या 1671 बेड्सची आवश्यकता आहे. तर 601 कोरोनाग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या रूग्णालयांमध्ये 1 लाख 5 बेड्स उपलब्ध आहेत.

अॅडव्हान्स अॅक्शनवर सुरुवातीपासून आपला प्रयत्न आहे, प्रशासन तयारीच्या बाबतीतही या व्हायरसपेक्षा एक पाऊल पुढे आहे. तुम्हा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. देश पूर्णपणे लढण्यासाठी तयार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी म्हटले. या लढ्यात सरकार आणि प्रायव्हेट सेक्टरही समाविष्ट आहे. यात सर्वात मोठी भूमिका सामान्य जनतेची असल्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावी आणि या परिस्थितीला गंभीररित्या घ्यावे असं आवाहन लव अग्रवाल यांनी केले.

24 तासातील कोरोनाबाधितांचे आकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सादर केले, मंत्रालयाच्या अहवालानुसार आतापर्यंत कोरोनाच्या 9152 पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत. कालपासून आतापर्यंत 909 नवी प्रकरणे समोर आली आहेत आणि मृतांचा आकडा 308 वर पोहोचला आहे. केवळ 24 तासात कोरोनाने भारतात 34 बळी घेतले आहेत. कोरोनाचे निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या 716 रुग्णांना घरी पाठवण्यात आल्यामुळे हे 716जण कोरोनापासून पूर्णपणे बरे झाले आहेत हीच आनंदाची बातमी असल्याचे लव अग्रवाल यांनी म्हटले. तर कालपासून 74 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

Leave a Comment