…तर लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ!


हैद्राबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 दिवसांसाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर तेलंगणा सरकारने लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी नागरिकांनी घराबाहेर पडल्यास दिसताचक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ, असा कठोर इशारा दिला आहे. कुणी लॉकडाऊन दरम्यान घराच्या बाहेर पडल्यास गोळ्या घालण्याचे आदेश देऊ. लष्कर बोलावून राज्यात संचारबंदी लावण्यात येईल, असा कठोर इशारा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे संपूर्ण देशभरात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची चर्चा सुरु आहे.

राज्याबाहेर राज्यातील नागरिकांनी जाऊ नये. तसेच रस्त्यावर कुणीही उतरु नका. कुणाला काही अडचण असेल तर 100 नंबरवर कॉल करा. तुमच्या घरी येऊन पोलीस तुम्हाला मदत करतील. नागरिकांनी राज्य सरकारला सहकार्य करावे, असे चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे.

Leave a Comment