शास्त्रज्ञांचा इशारा; …तर लाखाच्या घरात जाऊ शकतो भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा


नवी दिल्ली : दिवसेंदिवस भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतानाचे चित्र सध्यातरी दिसत आहे. कोरोना ग्रस्तांची संख्या कमी करण्यासाठी भारत सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासाठी मंगळवारी 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन असल्याची घोषणा केली केली. पण असे असले तरी शास्त्रज्ञांनी याबाबत धक्कादायक चिंता व्यक्त केली आहे. शास्त्रज्ञांच्या मते, कोरोनाग्रस्त रुग्णांची भारतातील संख्य अशीच वाढल्यास हा आकडा मेपर्यंत तब्बल 13 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, शास्त्रज्ञ आणि संशोधक यांनी कोरोनाबाबत कमी टेस्ट केल्या आहेत. इतर देशांपेक्षा भारतात ही संख्या कमी आहे. भारतात 18 मार्चपर्यंत केवळ 11 हजार 500 चाचण्या करण्यात आल्यामुळे ही गोष्ट भारतासाठी चिंताजनक आहे. एका भारतीय शास्त्रज्ञांनी मेडियम या माध्यमावर, कोरोनाच्या उपचारासाठी अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यांतून तिसऱ्या टप्प्यात गेल्यानंतर याचा गंभीर परिणाम भारताच्या आरोग्या सेवा प्रणाली होईल. अशा परिस्थितीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या रोखणे कठिण होईल, असे लिहिले आहे.

अमेरिका आणि इटलीमध्ये असाच काहीसा प्रकार घडला. दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात जाताना इटलीमध्ये तिपटीने कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली. सध्याची परिस्थिती भारताने आटोक्यात आणली असली तरी, येणारा काळ हा भारतासाठी धोकादायक असू शकतो, असेही या शास्त्रज्ञांनी सांगितले. भारत आणि अमेरिका यांचा सध्या कोरोना पसरण्याचा दर समान आहे. भारताने 19 मार्चपर्यंत अमेरिका पॅटर्न अंगीकारला आहे. तर, अमेरिकेतील रुग्णांची वाढ ही इटलीमध्ये होणाऱ्या वाढीसारखी होती. ज्यात साथीचा रोग सुरूवातीच्या काळात 11 दिवसांनी वाढला होता.

भारताकडे लोकसंख्येच्या मानाने सोयीसुविधा कमी आहेत. भारतात सध्या 1000 लोकांसाठी केवळ 0.7 बेड आहेत. तर फ्रान्समध्ये 6.5, दक्षिण कोरिया 11.5, चीन 4.2, इटली 2.9 आणि अमेरिका 2.8. त्यामुळं इतर देशांच्या तुलनेत भारतात परिस्थिती बिकट झाल्यास चिंतेचे वातावरण निर्माण होऊ शकते.

Leave a Comment