मुंबई: जगभराला आपल्या विळख्यात घेणाऱ्या कोरोना व्हायरसबाबत भारतातील लोकांमध्ये प्रचंड घबराट दिसून येत आहे. पण, आता या आजाराबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवे खुलासे होऊ लागलेले असतानाच आता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक नवा खुलासा केला आहे. त्यांनी याबाबत ट्विट करत कोरोनासाठी संशयित रुग्णांची तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही.
राज्यात काही दिवसात 4 ते 5 ठिकाणी प्रयोगशाळा वाढविण्यात येणार आहे.त्यामुळे सोशल मीडियावर सध्या कोरोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत असून कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही.नागरिकांनी चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये.#coronavirus
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 18, 2020
कोरोनासाठी राज्यातील संशयित रुग्णांची तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. त्या रुग्णाचा घशाचा द्राव ( ‘नसो फैरिंजीयल स्वाब’ ) घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो. कोरोनाच्या रुग्णांचे नमुने राज्यातील मुंबई, पुणे व नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले जातात, असे राजेश टोपे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
राज्यात संशयित रुग्णांची कोरोनासाठी तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. त्या रुग्णाचा घशाचा द्राव ( 'नसो फैरिंजीयल स्वाब' ) घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो. राज्यात मुंबई,पुणे व नागपुर येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या रुग्णांचे नमुने पाठविले जातात. #coronavirus
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 18, 2020
त्याचबरोबर त्यांनी असेही स्पष्ट केले आहे की, येत्या काही दिवसात राज्यातील 4 ते 5 ठिकाणी प्रयोगशाळा वाढविण्यात येणार असल्यामुळे सोशल मीडियावर सध्या कोरोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत असून कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही. नागरिकांनी चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये.