महाराष्ट्र सरकारच्या घोषणेमुळे फक्त 5 तासांत होणार मुंबई-गोवा प्रवास


मुंबई – महाराष्ट्र सरकारने मुंबई-गोवा प्रवास करणा-या चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून लवकरच गोवा एक्सप्रेस वे या नवीन महामार्गाचे काम सुरु करण्यात येणार असून सरकारच्या या घोषणेमुळे केवळ 5 तासांत मुंबई-गोवा अंतर पार करता येणार आहे. मुंबई ते नागपूर दरम्यानचा 701 किमी लांबीचा एक्सप्रेस-वे महाराष्ट्र सरकारकडून तयार केला जात असल्यामुळे हा प्रवास काही तासांमध्येच पूर्ण करता येणार आहे. त्याचबरोबर शनिवारी मुंबई –गोवा एक्सप्रेस वे योजनेची घोषणा करण्यात आली.

याबाबतची घोषणा शनिवारी म्हणजेच 14 मार्चला झालेल्या अप्पर हाऊसमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे आता लवकरच मुंबई-गोवा प्रवास केवळी 4-5 तासांत पूर्ण करता येणार आहे. तसेच मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ही योजना आखण्यात येणार आहे. या प्रवासात सध्या 11 ते 13 तासांचा वेळ जातो.

यासंदर्भात या प्रकल्पादरम्यान निसर्गाला कोणताही धोका पोहोचणार नाही, अशा स्वरुपाच्या प्रकल्पाच्या अहवालाची MSRDC ने मागणी केली आहे. मुंबई-गोवा एक्सप्रेस-वे तयार करताना निसर्गाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील अहवाल लवकरच तयार करण्यात येणार आहे.

कोकण भागातील पर्यटन क्षेत्रात या एक्सप्रेस वे मुळे वाढ होईल. परिणामी स्थानिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि पर्यटकांना कोकण किनारपट्टीचा आनंद घेता येईल. तसेच आयात-निर्यातही अगदी सहजपणे करता येईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Leave a Comment