‘त्या’ काळात महिलेने स्वयंपाक बनवल्यास ती पुढच्या जन्मी होणार श्वान


मुंबई : स्त्रियांबाबत इंदुरीकर महाराजांनी केलेले वक्तव्य चर्चेत असतानाच स्त्रियांबाबत आणखी एका स्वामींनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. स्वामी कृष्णा स्वरूप यांनी महिलांच्या मासिक पाळी संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

महिलांनी मासिक पाळी दरम्यान स्वयंपाक तयार केल्यास तिचा पुढील जन्म कुत्रीचा होता आणि ते भोजन पुरूषाने खाल्ल्यास त्याचा पुढील जन्म बैलाचा होतो, असे वक्तव्य गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील संत स्वामी कृष्णा स्वरूप यांनी केले आहे. त्यांचा आपल्या अनुयायांना अशाप्रकारे चुकीचे उपदेश करणारा व्हिडीओ समोर आल्यामुळे सर्वत्र नाराजीचे सुर उमटत आहेत.

अनुयायांना संबोधित करताना सोमवारी स्वामी कृष्णा यांनी हे वक्तव्य केले आहे. ते पुढे म्हणाले की, ही गोष्ट भलेही कुणाला कटू वाटेल पण हे खरे आहे, तसेच महिलांनी मासिकपाळी दरम्यान स्वयंपाक घरापासून दूर राहिले पाहिजे. नाही तर नरकात जायला तयार राहा, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

पुरुष अनुयायांना स्वामी कृष्णस्वरुप दासजी यांनी चेतावणीही दिली की, तुम्ही भलेही मासिकपाळीत असलेल्या स्त्रीकडून बनवलेल्या अन्नाचे सेवन कराल पण तिला याची समज नाही की, या तीन दिवसात तिने बनवलेल्या अन्नाचा काय प्रभाव पडतो. या बिंदूमधील प्रत्येकाला शास्त्रात परिभाषित करण्यात आले आहे. म्हणून लग्नापूर्वीच तुम्हाला जेवण बनवता आले पाहिजे.

Leave a Comment