तुम्ही पाहिले आहे का ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’चे नवे गाणे?


लवकरच आयुष्मान खुराना आणि जितेंद्र कुमार यांची मुख्य जोडी असलेला ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाची टीम सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद चित्रपटाच्या ट्रेलरलाही मिळाला आहे. आता या चित्रपटातील नवे गाणे रिलीज करण्यात आले आहे. बप्पी लहरी यांचे प्यार ‘बिना चैन कहा रे’ गाण्याचा हे रिमेक आहे.

रिमेकचा ट्रेण्ड सध्या बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतो. हा रिमेकचा ट्रेण्ड गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चित्रपटात एखादे तरी जुने गाणे रिक्रियेट केले जाते. यापैकी काही गाणी गाजतातही. पण काहींना टीकांना सामोरे जावे लागते. पण, प्रेक्षकांच्या पसंतीस ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’चे हे रिमेक गाणे उतरले आहे.

चित्रपटातील सर्व कलाकारांचा रेट्रे लुक या गाण्यात पाहायला मिळातो. तर, आयुष्मानच्या धमाल डान्सची झलक देखील पाहायला मिळते. या चित्रपटातील ‘गबरू’ आणि आयुष्मानच्या आवाजातील ‘मेरे लिये तुम काफी हो’ ही दोन गाणी यापुर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. सोशल मीडियावर या गाण्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आयुष्मान आणि जितेंद्र दोघेही या चित्रपटात समलैंगिक व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहेत. नीना गुप्ता, गजराज राव आणि मानवी गागरू यांचीही महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहे. हा चित्रपट २१ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

Leave a Comment