हिंगणघाट जळीतकांड : राज्य सरकार देणार पीडितेच्या भावाला नोकरी


हिंगणघाट : उपचारादरम्यान हिंगणघाटमधील शिक्षिकेचा मृत्यू झाला असून दरम्यान यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पीडितेच्या वडीलांशी बोलून त्यांचे सांत्वन केल्याचे देशमुख म्हणाले. त्याचबरोबर राज्य शासनामध्ये पीडितेच्या भावाला नोकरी देण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

जलदगती न्यायालयात हिंगणघाटच्या घटनेच्या खटला चालवणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. त्याचबरोबर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट घेऊन त्यांना हा खटला चालवण्याबाबत निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी घटना असल्याचे म्हटले आहे. हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेच्या मृत्यूनंतर सरकारने कडक कायदा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा केल्याची माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. तर कठोर कायद्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनीही म्हटले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंगणघाट प्रकरणी दोषीला फाशी देण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावा अशी मागणी केली आहे.

Leave a Comment