भारताने थांबवली चीनला होणारी मिरचीची निर्यात


मुंबई : जगाच्या अर्थकारणावर चीनच्या कोरोना व्हायरसमुळे मोठा परिणाम होण्यास सुरुवात झाली असून चीनला भारताकडून होणारी मिरचीची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. शेतकऱ्यांना तातडीने उपाययोजना आखत पीडित शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलासा द्यावा, अशी मागणी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते केव्हीपी रामचंद्रराव यांनी राज्यसभेत बोलताना केली.

त्याचबरोबर तेथील बड्या कंपन्यांना देखील कोरोना व्हायरसमुळे मोठा फटका बसला आहे. कोरोनाने चीनच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. त्यातील चीनमधील अॅपलने आपली ४२ शो रुम्स बंद केली आहेत. तर स्टारबक्सचे चार हजारांच्या वर कॅफे बंद पडले आहेत. अख्ख्या जागतिक अर्थव्यवस्थेचा कोरोनाने बँड वाजवला आहे.

आतापर्यंत ७१७ पेक्षा जास्त जणांचा कोरोना व्हायरसने बळी घेतला आहे. त्याचप्रमाणे ३४ हजार लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. कोरोनो व्हायरसचा अवघ्या जगाने धसका घेतला आहे. भारतात पहिला संशयित केरळमध्ये आढळला आहे. त्यामुळे कोरोना केरळलगत असलेल्या कोकणात कधीही प्रवेश करू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणा त्यादृष्टीने अधिकच सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Comment