संजय राऊतांना आदित्य ठाकरेंनी फटकारले


मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यावरुन सुरु असलेला वाद शांत होण्याचे चित्र सध्यातरी दिसत नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सावरकरांना विरोध करणाऱ्यांना थेट अंदमानात पाठवायला पाहिजे असे मत केले होते. काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर त्यांचा हा रोख होता असे मत व्यक्त केले जात आहे. संजय राऊतांनी महाआघाडीचे सरकार वेग पकडत असतानाच पुन्हा एकदा असे वक्तव्य केल्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण होईल अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. काँग्रेसवर राऊतांनी टीका केल्यानंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांना फटकारले आहे. कोणत्या संदर्भात त्यांनी हे वक्तव्य केले पहावे लागेल, असे देखी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ते म्हणाले, संजय राऊतांचे हे वैयक्तिक मत असेल. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. काँग्रेस-शिवसेनेची युती कायम आहे. दोन वेगळ्या विचारधारा एकत्र येऊन काम करतात यालाच लोकशाही म्हणतात. भारतरत्न कोणाला द्यायचे हे भाजपच्या हातात असल्यामुळे त्यांनी ते कोणालाही द्यावे. पण, आपण इतिहासावर अजून किती दिवस बोलणार.

आपल्या देशाच्या इतिहासाकडून शिकावे, प्रेरणा घ्यावी आणि आजचे प्रश्न सोडवावेत. पण सावरकरांसारखे महापुरुष ही रत्नेच आहेत. असे वाद पाहून त्यांनाही वाईट वाटेल. जे काही सध्या देशात चालले आहे ते बघुन महापुरुषांना लाज वाटेल. देशाची अर्थव्यवस्था बघा. देशातील समस्या बघा. त्यावर काम करणे गरजेचे आहे.

विरोधक मुंबई नाईटलाईफबाबत माहिती न घेता बोलत आहेत. जे आपण सुरु करत आहोत, ते नाईट लाईफ नाही, मुंबई 24 तास ही त्यामागची कल्पना आहे. याला नाईट लाईफ म्हणा किंवा मुंबई 24 तास म्हणा. ड्राय डे आणि मुंबई 24X7 मध्ये काहीही संबंध नाही. लंडनची नाईट टाईम इकॉनॉमी 5 बिलीयन पाऊंडस् आहे. हॉटेल्स, मॉल खुले राहिले तर बेस्ट, ओला, उबर, टँक्सी सुरु राहतील. मुंबईत रोजगांर वाढवण्याच्या दृष्टीनं मुंबई 24 तास सुरु ठेवणे ही यामागची संकल्पना आहे. मॉल, मिल कपाऊंड परिसरात कुठेही रहिवासी परिसर नसल्यामुळे, रहिवाशांना याचा त्रास होणार नाही.

Leave a Comment