जगाच्या अंतापर्यंत दुसरे शिवछत्रपती होणे नाही – जितेंद्र आव्हाड


मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहण्यात आलेल्या एका पुस्तकाचे दिल्लीतील भाजप कार्यालयात एका कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले आहे. या पुस्तकाचे ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे नाव आहे. भाजपसह नरेंद्र मोदी यांच्यावर यावरुन जोरदार टीका होत आहे. जगाच्या अंतापर्यंत दुसरे शिवछत्रपती होणे नाही. हे मनाला पटत नाहीत. ह्यांचे डोके फिरले असल्याचे म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला. तर या पुस्तकाची ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी होळी करुन निषेध नोंदवला आहे.

देशभरात भाजप सरकारविरोधात सीएए, एनआरसी कायद्यावरून टीका केली जात आहे. अशातच आता दिल्लीत प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदींची तुलना करणारे एक पुस्तक प्रकाशीत करण्यात आले आहे. हे पुस्तक जय भगवान गोयल नावाच्या भाजप नेत्याने लिहिले असून, त्यांनी ट्विट करून पुस्तक प्रकाशित केल्याची माहिती दिली. दिल्लीच्या भाजप कार्यालयात शनिवारी ‘धार्मिक सांस्कृतिक संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. यामध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

Leave a Comment