बोगस पदवी प्रकरणी विनोद तावडेंकडून उदय सामंत यांची पाठराखण


रत्नागिरी – एकाच विद्यापीठातून राज्याचे सध्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत आणि मी पदवी घेतली असून सामंत यांच्या पदवीबाबत निर्माण केलेली अफवा चुकीची असल्याचे सांगत सामंत यांची भाजपचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पाठराखण केली आहे. विनोद तावडे चिपळूण येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

हल्ला आणि हिंसा याचा निषेध केला पाहिजे. जेएनयूवर झालेल्या हल्ल्याचा निषेधच आहे. ठराविक विचारधारेचे लोक हे मुद्दाम करत आहेत. जेएनयू प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला जाणीवपूर्वक बदनाम केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘गेट वे ऑफ इंडिया’वर ठाकरे सरकारमधील मंत्री मोर्चा काढून कश्‍मीर मुक्तीच्या घोषणा देतात. बाबरीचे काँग्रेसने समर्थन केले. राममंदिराला विरोध केला होता. बाळासाहेब ठाकरे आज असते, तर काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करण्यास त्यांनी कधीही परवानगी दिली नसती. दुय्यम दर्जाची खाती ठाकरे सरकारमध्ये मिळाली म्हणून अनेकजण नाराज आहेत. शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले असते तर कुणीही नाराज झाले नसते. कारण शिवसेनेला 50 टक्के मंत्रिपदे मिळाली असती. परंतु, निवडणुकीच्या आधीच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ठरले होते, असे तावडे म्हणाले.

Leave a Comment