… तर वेळप्रसंगी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसेन – बच्चु कडू


अमरावती – जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास यांसह अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या खातेवाटपात राज्य मंत्री बच्चू कडू यांना देण्यात आल्या आहेत. खातेवाटपानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, शेतकऱ्याची अडवणूक करणे चुकीचे असून मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना भेटण्याचा प्रत्येक सामान्य माणसाला अधिकार आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळप्रसंगी मंत्रालयाबाहेर मी खुर्ची टाकून बसेन. जेणेकरून मंत्रालयाच्या पायऱ्या चढण्याआधीच त्यांच्या समस्या सोडवल्या जातील.

आमचा मिळालेल्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न राहील. जलसंपदा अत्यंत महत्वाचा विषय असून त्याची विदर्भात गरज आहे. दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या महाराष्ट्राचे पाणी नियोजन करून भ्रष्टाचार थांबवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन बच्चू कडू यांनी यावेळी दिले. जे चांगले अधिकारी महाराष्ट्रात आहेत त्यांना खांद्यावर घेऊ. पण विनाकारण त्रास देणाऱ्यांना बच्चू कडू मंत्री आहे हे विसरून अद्दल घडवणार, अशी तंबीही त्यांनी यावेळी भ्रष्ट अधिकाऱ्यांना दिली आहे.

Leave a Comment