…तर ६ महिन्यात एअर इंडियाला टाळे ?


नवी दिल्ली – आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडलेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला जर खरेदीदार मिळाला नाही तर ती पुढील वर्षीच्या जूनपर्यंत बंद करावी लागण्याची शक्यता असल्याची माहिती एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचबरोबर या अधिकाऱ्याने तुकड्या-तुकड्याने मिळालेल्या मदतीवर जास्त काळापर्यंत गाडी चालवली जाऊ शकत नसल्याचेही म्हटले आहे.

या अधिकाऱ्याने एअर इंडियाच्या भविष्याबाबत वाढत चाललेल्या अनिश्चिततेबाबत म्हटले की, उड्डाणाअभावी १२ छोटे विमाने उभी आहेत. त्यांना पुन्हा चालू करण्यासाठी निधीची गरज असून सुमारे ६० हजार कोटी रुपयांचे विमान कंपनीवर कर्ज आहे. निर्गुंतवणकीच्या पद्धतीवर सरकार काम करत आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर या अधिकाऱ्याने म्हटले की, पुढील वर्षीच्या जूनपर्यंत जर कोणी संभाव्य खरेदीदार नाही मिळाला तर एअर इंडिया पण जेट एअरवेजप्रमाणे रस्त्यावर येऊ शकते. सरकारने खासगीकरणाच्या योजनांदरम्यान कर्जाखाली दबल्या गेलेल्या कंपनीत आणखी गुंतवणूक करण्यास नकार दिल्यामुळे एअर इंडियाला कोणत्याही पद्धतीच्या मदतीची तरतूद करुन काम करावे लागत आहे. अशा पद्धतीने दीर्घ काळापर्यंत ही कंपनी चालणे मुश्किल आहे.

मोठ्या मुश्किलीने आम्ही या परिस्थितीत कसे तरी काम करत आहोत. आम्ही अशा स्थितीत जूनपर्यंत काम करु शकतो. जर कोणी खरेदीदार मिळू शकला नाही तर आम्हाला दुकान बंद करावे लागेल.कंपनी सुरु राहावी म्हणून आम्ही सरकारकडे २४०० कोटी रुपयांची सरकारी गॅरंटी मागितली होती. परंतु, फक्त ५०० कोटी रुपयाचीच सरकारने सरकारी गॅरंटी दिली.

चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत एअर इंडियामधील आपल्या हिस्स्याची विक्री करण्यासाठी सरकार रुची पत्र जारी करु शकते. याचा व्यवहार खरेदीदार मिळाल्यास पूर्ण करण्यासाठी किमान सहा महिने लागू शकतात. पण यासाठी पुढील महिन्यात विक्री प्रक्रिया सुरु व्हायला हवी. परंतु, आर्थिक स्थिती पाहता सरकारला गुंतवणूकदार मिळण्याची शक्यता कमी आहे.

Leave a Comment