अखेर ठाकरे सरकारचे खातेवाटप जाहीर


मुंबई : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 14 दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातील खात्यांचे वाटप जाहीर केले. उद्धव ठाकरे यांनी सहा मंत्र्यांसह 28 नोव्हेबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर लवकरच खातेवाटप जाहीर होईल असे सांगितले जात होते.

पण खातेवाटप महत्त्वाच्या खात्यांवरून मतभेद असल्याने जाहीर करण्यात येत नव्हते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर खातेवाटपाचा निर्णय जाहीर करण्यात आला. यात महत्त्वाची खाती राष्ट्रवादी आणि काँग्रेसला देण्यात आली आहे. तर शिवसेनेने गृह आणि नगरविकास ही खाती आपल्याकडे ठेवली आहेत. तर नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यात अजित पवारांसह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असेल असे सांगितले जात आहे

शिवसेना

  • एकनाथ शिंदे – गृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण
  • सुभाष देसाई – उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खार भूमी विकास

राष्ट्रवादी काँग्रेस

  • जयंत पाटील – वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्यांक विकास
  • छगन भुजबळ – ग्रामविकास, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन

काँग्रेस

  • बाळासाहेब थोरात – महसूल, उर्जा व अपारंपारिक उर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेक शिक्षण, पशू संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय
  • नितीन राऊत – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण

Leave a Comment