पुरुष क्रिकेटपटुला लाजवेल अशी कामगिरी केली या महिला क्रिकेटपटूने


पोखारा – नेपाळ आणि मालदीव यांच्यात झालेल्या टी-२० सामन्यात नेपाळची महिला क्रिकेटपटू अंजली चंदने एकही धाव न देता ६ बळी घेण्याची किमया केली. अंजली या विक्रमासहसह टी-२० मधील महिला आणि पुरुष या दोघांमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरली आहे.

केवळ १६ धावा प्रथम फलंदाजीस उतरलेल्या मालदीवला करता आल्या. ५ चेंडूतच नेपाळने हे लक्ष्य पूर्ण केले. अंजलीने सातव्या षटकात ३ तर नवव्या षटकात २ गडी बाद केले. डावाच्या ११ व्या षटकात तिने अजून एक बळी घेत मालदीवच्या डावाचा अंत केला. संपूर्ण सामन्यात केवळ १३ चेंडू अंजलीने फेकले.

अंजलीने यासह महिला क्रिकेट आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज होण्याचा विक्रम नोंदवला आहे. मालदीवच्या मॅस इलियासाने यापूर्वी यावर्षी चीनविरुद्ध ३ धावा देऊन ६ बळी घेतले होते. टी-२० मधील पुरुषांमध्ये सर्वोत्तम गोलंदाजाचा मान भारताच्या दीपक चाहरकडे असून त्याने १० नोव्हेंबरला बांगलादेशविरुद्ध २.२ षटकांत ७ धावा देऊन ६ बळी घेतले होते.

Leave a Comment