शरद पवार, उद्धव ठाकरेंनी ऐकला नाही माझा सल्ला


बॉलीवूडची ड्रामा क्वीन अर्थात अभिनेत्री राखी सावंत कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायमच चर्चेत असते. काही वेळा आपल्या बेताल वक्तव्यामुळे तर काही वेळा ती तिच्या बिनधास्त व्हिडीओमुळे चर्चेत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यात ती राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर भाष्य करत आहे. त्याचबरोबर तिचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपला सल्ला ऐकला नसल्याचे असे म्हणणे आहे.

View this post on Instagram

Aagye modi ji mai hu aadhe maa

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on


तिने या व्हिडीओत आपापसात भांडू नका, लवकरात लवकर निर्णय घ्या आणि सरकार स्थापन करा असे पवार साहेबांना आणि शिवसेनेला मी सांगितले होते असल्याचा सवाल देखील तिने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. आपल्याला उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यामुळे प्रचंड दु:ख झाल्याचेही ती सांगत आहे. गेली ना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची तुमच्या हातून उद्धव ठाकरे साहेब… तुम्हाला मी सांगत होते एकमेकांशी भांडू नका…निर्णय घ्या…माझी किती इच्छा होती की उद्धव साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे… असे देखील राखी आपल्या व्हिडीओत म्हणत आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राखीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे देखील कौतुक केले आहे. मोदीजी किती पावरफुल आहेत हे पाहिले ना…’ असे म्हणत शरद पवार यांना मोदींनी फोन करून महाराष्ट्रातील राजकारणाचे चित्र रातोरात कसे पालटवले असा टोलाही लगावला आहे. जरी आपल्याला या सगळ्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी वाटत असले तरी या सगळ्यामागे खरे डोक अमित शहांचे असून या घटनाक्रमामागे तेच खरे मास्टरमाईंड असल्याचेही राखी म्हणाली आहे.

Leave a Comment