राज्यातील मंत्र्यांना गाड्या-बंगले परत करण्याचे निर्देश


मुंबई : आता मुख्यमंत्र्यांसह सर्व माजी मंत्र्याना मंत्रिपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आपला सरकारी ऐवज परत करावा लागणार आहे. जुन्या सरकारचा कार्यकाळ ९ नोव्हेंबरला संपुष्टात आला. आपल्या मुख्यमंत्री पदाचा देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभाग पाहत होते. दरम्यान राज्यपालांनी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या तिघांना सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. पण कोणीही दिलेल्या अवधीत बहुमत सिद्ध करु न शकल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. पर्यायाने सर्व पदे आणि खाती संपुष्टात आल्यामुळे आधीच्या सरकारमधील सर्वांनाच आपले बंगले आणि कार्यालय सरकारला परत द्यावे लागणार आहेत.

मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळाला सरकार स्थापन झाल्यावर सरकारी सुविधा दिल्या जातात. ज्यामध्ये मंत्र्याचे बंगले, कार्यालय, गाड्या या सुविधा असतात. पण या सुविधा कार्यकाळ संपल्यानंतर सामान्य विभाग प्रशासनाला परत द्यावा लागतात. आज सर्वाची यांच्यामार्फत यादी केली जाईल. त्यानंतर यादीनुसार सर्व सामान पाहून ते जमा केले जाईल. कार्यकाळ संपल्यानंतर यासंदर्भातील निर्देश मंत्रीमंडळाला देण्यात आले होते.

Leave a Comment