मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार – संजय राऊत


मुंबई -शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री फक्त आणि फक्त शिवसेनेचाच होणार असून भाजप पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना खोटे ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचबरोबर भाजप दिलेला शब्द का पाळत नाही? सरकार स्थापनेचा निर्णय महाराष्ट्रातील जनतेच्या मतानुसार होणार असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी यावेळी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा विश्वास व्यक्त केला. शपथग्रहण होणार आणि ग्रहण सुटणार. आता महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलत आहे. शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्याही वाढत आहे. कोण-कोण शरद पवारांबरोबर बोलत आहे हे माहीत आहे. जर मी शरद पवारांबरोबर बोललो तर तो अपराध झाला का? असा सवाल त्यांनी केला आहे. शरद पवार देशाचे नेते आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आमदार आहेत. आम्ही इतर पक्षांशी संपर्क करत असल्यामुळे ज्यांच्या पोटात दुखत आहे तेही कसा काय इतर पक्षांनी संपर्क करत असल्याचा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजपला लावला.

न्याय अधिकार आणि सत्यासाठी शिवसेनेची लढाई आहे. सत्तेची हाव सर्वांना आहे, खुर्च्या त्यांना सोडायच्या नाहीत, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. जनतेला सत्य काय आहे हे माहीत आहे. कोण खोटे बोलत आहे हे सर्वांना माहीत आहे. शिवसेनेने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांकडून अजूनही संपर्क करण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment