इस्लामाबाद – काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम भारत सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला. हे कलम रद्द करण्याच्या चर्चा अनेक वेळा करण्यात आल्या होत्या, पण भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी अखेर २०१९ मध्ये हा निर्णय जाहीर केला. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. या मुद्द्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, इतर केंद्रीय मंत्री आणि काही पाकिस्तानी सेलिब्रिटी यांनी आपली टोकाची मते मांडली. नुकतेच अण्वस्त्रांसंबंधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जावेद मियांदाद याने दर्पोक्ती केली होती. त्यातच पुन्हा एक चिथावणीखोर वक्तव्य आता मियांदादने केले आहे.
Former Pakistan cricketer Javed Miandad threatening India while holding a sword: Pehle main balle se chakka marta tha, ab talwar se insaan maaronga (If I can hit six with a bat, why can't I swing sword.. I used to hit sixes with bat, now I'll kill humans with sword)… pic.twitter.com/blmK1XnbKS
— Navneet Mundhra (@navneet_mundhra) September 1, 2019
काश्मीरी बांधवांनो, तुम्ही काळजी करू नका. तुमच्यासोबत आम्ही आहोत. जेव्हा माझ्या हातात बॅट होती मी तेव्हा षटकार मारले होते. आता तलवार चालवेन. पहिले बॅटने मी षटकार लगावले आहेत, तर तलवारीने माणसे मारू शकत नाही का?, असे चिथावणीखोर वक्तव्य जावेद मियांदाद याने केले आहे. त्याच्या या वक्तव्याचा व्हिडीओ ट्विटरवर प्रचंड व्हायरल होत आहे.