अशी आहे आमिर खान आणि किरण राव यांची प्रेमकहाणी


प्रेम हे आयुष्यामध्ये कोणाला कधी मिळेल हे नेमके कोणीच सांगू शकत नाही. काहींच्या बाबतीत ही भावना पहिल्या भेटीतच अनुभवता येते, तर काहींना अनेक भेटींच्या नंतर प्रेमात पडल्याचा अचानक साक्षात्कार होतो. आमिर खान आणि किरण राव यांची प्रेमकहाणी अशीच काहीशी आहे. आशुतोष गोवारीकर यांच्या ‘लगान’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना आमिर आणि किरण यांची प्रथम भेट झाली. सुरुवातीला केवळ एकमेकांचे चांगले मित्र असणाऱ्या या दाम्पत्याची कालांतराने मनेही जुळली आणि एका परफेक्ट लव्ह स्टोरीला सुरुवात झाली. आज हे दाम्पत्य आपले वैवाहिक आयुष्य मोठ्या आनंदाने कंठीत आहे.

२००२ साली ‘लगान’ चित्रपटामध्ये आशुतोष गोवारीकर यांची असिस्टंट डायरेक्टर म्हणून किरण त्यावेळी काम पहात होती, तर या चित्रपटामध्ये आमिर नायकाच्या भूमिकेमध्ये होता. त्या काळी त्या दोघांची एकमेकांशी चांगली मैत्री होती. त्यावेळी आमिरचा विवाह झाला असून, तो, त्याची पत्नी रीना दत्ता सोबत रहात होता. या दाम्पत्याला दोन मुले ही होती. पण त्यावेळी आमिर आणि रीना यांचे वैवाहिक संबंध बिघडत चालले असल्याने तो ककाळ आमिरसाठी मानसिक दृष्ट्या अतिशय तणावपूर्ण असल्याची कबुली आमिर देतो.

दरम्यान ‘लगान’चे चित्रीकरण संपल्यानंतर आमिर आणि किरणची पुनश्च भेट, एका जाहिरातीच्या चित्रिकरणादरम्यान झाली. त्यावेळी एकमेकांच्या सोबत वेळ घालविताना त्यांना, त्यांच्याही नकळत एकमेकांचा सहवास आवडू लागला होता. आमिर आणि किरण यांच्या सातत्याने भेटीगाठी होऊ लागल्या असल्या, तरी आपले नाते त्यापुढे नेण्याची तयारी अद्याप दोघांचीही नव्हती. त्यांच्या मैत्रीला दोन वर्षांचा काळ उलटून गेल्यानंतर २००४ साली दोघांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. आमिरच्या आयुष्यामध्ये किरण सर्वात महत्वाची व्यक्ती असून, तिच्याशिवाय आपल्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नसल्याचे आमिर म्हणतो.

किरणच्या बाबतीत बोलायचे झाले, तर तिला आमिर पहिल्याच भेटीत आवडून गेला होता. अतिशय सरळ स्वभावाचा, स्वतःच्या कामाच्या बाबतीत पराकाष्ठेचा चोखंदळ असणाऱ्या आमिरचे व्यक्तीमत्व किरणला सहज आवडून गेले होते. आता देखील पती-पत्नी असतानाचा आपण एकमेकांचे उत्तम मित्र असून, दोघांना एकमेकांच्या विषयी आदर वाटत असल्याचे किरण म्हणते. किरणच्या सहवासात आल्यानंतर आमिरने स्वतःच्या जीवनामध्ये अनके बदल घडवून आणले. किरणकडून प्रेरणा घेत आमिरने आता व्हेगन आहार पद्धतीचा स्वीकार केला आहे. एकमेकांच्या सहवासात अतिशय आनंदी असलेले ही दांपत्य आता बॉलीवूडचे ‘पावर कपल’ म्हणून ओळखले जाते.

Leave a Comment