विराट व रोहितवर राखी सावंतची आगपाखड


विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध १८ धावांनी भारताचा पराभव झाला होता. भारतीय संघाचे या पराभवासह स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. रोहित, राहुल आणि कर्णधार कोहली या सामन्यात प्रत्येकी केवळ एका धावेवर तंबूत दाखल झाले होते. अभिनेत्री राखी सावंतने भारताच्या या निराशाजनक खेळीवर जोरदार टीका केली आहे. तुम्ही वर्ल्ड कपसाठी खेळायला गेला होतात की हनिमूनसाठी, असा सवाल तिने विराट कोहली व रोहित शर्माला विचारला आहे.


खेळाडूंच्या पत्नी त्यांच्यासोबत का गेले आहेत. हे काही हनिमून नाही. वर्ल्ड कप पाच वर्षांत एकदाचा येतो आणि हा चषक आपला झाला असता. तुम्ही वर्ल्ड कपनंतर मनाला वाटेल तिथे पत्नीसोबत फिरू शकता. पण खेळावर लक्ष केंद्रीत आता करणे गरजेचे होते, अशा शब्दांत ती राग व्यक्त करताना दिसत आहे. ‘वर्ल्ड कप’पेक्षा ‘हनिमून कप’ असल्यासारखे वाटत असल्याची टीकाही तिने केली. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Leave a Comment