भारतीय संघाला मिळेना रिर्टन तिकीट


लंडन : टीम इंडियाचा विश्वचषकातील प्रवास संपला असून त्यांचा आता परतीचा प्रवास सुरु झाला आहे. पण एक वेगळाच प्रश्न भारतीय संघासमोर निर्माण झाला आहे. बुधवारी सेमीफायलनध्ये न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव केला. भारतीय खेळाडू त्या पराभवानंतर मायदेशी परतण्यासाठी निघाले, पण त्यांचे परतीचे तिकीटच बूक न झाल्याने, त्यांना आता जबरदस्तीने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत इंग्लंडमध्ये राहावे लागणार आहे.

टीम इंडियाची वाहतूक व्यवस्था पाहणारे व्यवस्थापकाची याप्रकारामुळे डोकेदुखी वाढली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय अद्यापपर्यंत भारतीय खेळाडूंच्या रिटर्न तिकिटांची व्यवस्था न करु शकल्यामुळे भारतीय संघाला रविवारपर्यंत मँचेस्टरमध्येच राहावे लागणार आहे.

बीसीसीआयने सेमीफायनलमधील पराभवानंतर खेळाडूंचे रिटर्न तिकीट बुक करण्याचा ऐनवेळी प्रयत्न केला, पण तिकीटे मिळाली नाहीत. त्यामुळे लॉर्ड्सच्या मैदानावर आता 14 जुलैला न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्यानंतरच भारतीय संघ मायदेशी परतेल.

गुरुवारी भारतीय संघाने हॉटेल सोडले होते. पण आता अंतिम सामना होईपर्यंत त्यांना येथेच राहावे लागणार आहे. काही खेळाडू इंग्लंडवरुन थेट भारतात येतील, तर काहीजण फिरण्यासाठी विविध ठिकाणी जाणार आहेत.

3 ऑगस्टपासून भारतीय संघाला वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात 3 टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये दोन सामने होतील. त्यानंतर 8 ते 14 ऑगस्टदरम्यान वन डे मालिका होईल. यानंतर मग दोन सामन्यांची कसोटी मालिका होईल.

Leave a Comment