आयपीएस अधिकाऱ्याचा पुराव्यासह दावा, श्रीदेवींचा खूनच झाला


मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूवरून केरळमध्ये आपल्या कामामुळे प्रसिद्ध असलेले जेल डीजीपी आणि आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंह यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ऋषिराज सिंह यांनी श्रीदेवी यांचा मृत्यू अपघात नाही तर त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा दावा केला आहे. हा दावा ऋषिराज सिंह यांनी त्यांचा सहकारी डॉ. उमादथन भारत यांच्या हवाल्यातून केला आहे. डॉ. उमादथन भारत हे प्रसिद्ध फॉरेंसिक सर्जन होते. ते गुन्हेगारी घटना आणि विशेषत: खूनी रहस्य सोडवण्यात तरबेज होते. उमादथन यांना श्रीदेवीचा अपघाती मृत्यू नाही तर त्यांची हत्या झाली असल्याचा दावा ऋषिराज सिंह यांनी केला आहे. ऋषिराज सिंह त्याबद्दल बोलताना म्हणाले की, उमादथनशी श्रीदेवी यांच्या हत्येबद्दल मी बोलत होतो. त्यांनी तेव्हा मला धक्कादायक माहिती दिली आहे. श्रीदेवींच्या हत्येचा जवळून अभ्यास त्यांनी केला आहे. अशा काही घटना या तपासावेळी समोर आल्या ज्यातून स्पष्ट होते की श्रीदेवी यांची हत्या करण्यात आली आहे. त्यासंबंधी अनेक पुरावेदेखील आहेत.

उमादथन यांच्या निधनानंतर ऋषिराज सिंह यांनी त्यांच्या आयुष्यावर एक लेख लिहिला होता. त्यांनी त्या लेखात श्रीदेवींच्या हत्येचा खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी लिहलेल्या लेखानुसार, दारुच्या नशेत कोणतीही व्यक्ती एका छोट्या बाथटबमध्ये बुडून मरू शकत नाही. दुबईच्या एका हॉटेलमध्ये 24 फेब्रुवारी 2018ला त्यांचा मृत्यू झाला होता. श्रीदेवींनी लग्नसमारंभात अतीमद्यपान केल्यानंतर त्या बाथरूमध्ये गेल्या तोल जाऊन पडल्या. पडल्यामुळे त्यांच्या नाकातोंडात पाणी गेले आणि त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली होती. त्यावेळी त्यांचा मृत्यू अपघाती असल्याचे सांगण्यात आले होते.

ऋषिराज सिंह यांनी लिहिलेल्या लेखानुसार, एखाद्या बाथटबमध्ये बुडून कोणाचाही मृत्यू होईल हे शक्य नाही. मुळात बाथटबमध्ये बुडणे शक्य नाही. कारण बाथटबमध्ये त्या अगदी फिट बसत होत्या. त्यांनी दावा केली की, श्रीदेवींचे दोन्ही पाय पकडले होते आणि त्यानंतर त्यांचे डोके पाण्यात घालून त्यांना मारण्यात आले. ऋषिराज सिंह यांनी लेखातून केलेल्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

2-3 दिवस श्रीदेवी रूममधून बाहेर आल्या नव्हत्या तर बोनी कपूर त्यांना सोडून भारतात का परतला असा सवाल दुबई सरकारने बोनी यांना विचारला होता. बोनी कपूर यांच्यावर त्यावेळी संशयाची सुई होती. पण त्यावेळी कोणतेही पुरावे मिळाले नाहीत म्हणून त्यांचा अपघाती मृत्यू झाला असे सांगण्यात आले आणि ते प्रकरण तिथेच बंद करण्यात आले.

दरम्यान, उमादथन यांच्या हवाल्याने केलेल्या ऋषिराज सिंह यांनी दाव्यात स्पष्ट म्हटले, आहे की, श्रीदेवी यांचा अपघाती मृत्यू नाही तर त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या या दाव्यावर पुन्हा काही तपास होणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे आहे.

Leave a Comment