आता रिलीज केले ‘भारत’चे नवे गाणे


बॉक्स ऑफिसवर सलमान खान – कतरिना कैफ यांची जोडी असलेल्या ‘भारत’ चित्रपटाची घोडदौड कायम आहे. हा चित्रपट ‘ईद’च्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. अगदी पहिल्या दिवसापासूनच कमाईचे उच्चांक गाठणाऱ्या भारतने आत्तापर्यंत १५० कोटीपेक्षाही अधिक गल्ला जमवला आहे. प्रदर्शनानंतर आता ‘भारत’मधील नवे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

‘भारत’ म्हणजेच सलमान खान वडिलांना दिलेले वचन पाळण्यासाठी कशाप्रकारे मेहनत घेतो. त्याला त्यासाठी कशाप्रकारे पाच रुपे साकारावी लागतात. तो आपले वडिल परत येण्याची शेवटपर्यंत वाट पाहतो. अशाच आशयाचे भावनिक गाणे ‘आया ना तू’ हे रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे रिलीज होताच चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

फाळणीच्या वेळी वडील आणि मुलगा एकमेकांपासून वेगळे होतात. त्यानंतर आयुष्याच्या उतारवयापर्यंत ‘भारत’ त्याच्या वडिलांना दिलेले वचन पाळत असतो आणि त्यांच्या येण्याची वाट पाहत असतो. हेच या गाण्यात दाखवले आहे. चाहत्यांचा ‘भारत’ चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळतो आहे. आता या चित्रपटाच्या कमाईत आणखी किती भर पडते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment