टीम इंडियावर भारतीय पत्रकारांचा बहिष्कार


लंडन : भारत वगळता इतर सर्व संघांनी आयसीसी विश्वचषक स्पर्धेमध्ये एक-एक सामना खेळला आहे. तरी, गुणतालिकेत भारतीय संघ सातव्या क्रमांकावर आहे. दरम्यान बुधवारी भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरोधात होणार आहे. पण भारतीय संघ या सामन्याआधी वादात अडकला आहे. विराटसेनेवर भारतीय पत्रकारांनी बहिष्कार टाकला आहे. भारतीय संघाने आयसीसीच्या आयोजित पत्रकार परिषदेत अश्या दोन खेळाडूंना पत्रकार परिषदेला पाठवण्यात आले जे विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या संघाचा भाग नाही. नाराज पत्रकारांनी त्यामुळे या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला आहे.

आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या प्रोटोकॉलनुसार आयसीसी टीम संपुर्ण कार्यक्रमाची माहिती पत्रकारांना दिली जाते. संघाच्या सरावाची आणि खेळाडूंबद्दलची माहिती यावेळी पत्रकारांना दिली जाते. तर, 24 मे रोजी विश्वचषक स्पर्धे खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडला पोहचल्यानंतर केवळ एकदाच पत्रकार परिषदेत झाली. केएल राहुलने बांगलादेश विरुद्धच्या सराव सामन्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला होता. पण कोणत्याही खेळाडूने किंवा स्टाफने त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधलेला नाही.

5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरोधात होणाऱ्या सामन्यासंदर्भात सोमवारी भारतीय संघ पत्रकारांशी संवाद साधणार होता. पण पत्रकार परिषदेला सुरुवात होण्याआधी दीपक चहर आणि आवेश खान यांना पत्रकारांशी चर्चेस पाठवण्यात आले. हे दोन्ही गोलंदाज संघाला नेट प्रक्टिससाठी मदत करतात. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी या वादानंतर भारतीय संघानं एकही सामना खेळला नसल्यामुळे ते काय बोलणार, असे उत्तर दिले. यानंतर पत्रकारांनी खेळाडूंशी संवाद साधण्याऐवजी पत्रकार परिषदेवरच बहिष्कार टाकला.

दरम्यान याबाबत बीसीसीआयवर आयसीसीही नाराज आहे. नुकतेच बीसीसीआयला प्रोटोकॉल न पाळल्याचे पत्र आयसीसीने पाठवले होते. सामना होऊनही भारतीय संघ मीडियासमोर आलेले नाही. तर, इतर संघ विविध कार्यक्रमांना हजर असतात. त्यामुळे आयसीसीला चिंता आहे की, भारतीय संघाच्या या वागणुकीमुळे इतर संघही मीडियापासून लांब राहतील. यासंदर्भात आयसीसीने बीसीसीआयला पत्राद्वारे खडेबोल सुनावले आहे.

Leave a Comment