17 जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन


मुंबई – 17 जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून याविषयी निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत झाला आहे. मुंबईतच हे अधिवेशन होणार असून ते तीन आठवडे चालणार आहे.

12 दिवस यात प्रत्यक्ष कामकाज चालणार आहे, तर 18 जूनला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. 19 ते 20 जून या दोन दिवसात मागील अधिवेशनात राहिलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा केली जाणार आहे.

21 जून व 24 जूनला प्रत्यक्षात अर्थसंकल्पावर चर्चा केली जाणार असल्याचे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असल्यामुळे 17 जूनपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चालणार आहे.

Leave a Comment