नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यावर टीका करताना राबडी देवींची जीभ घसरली


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि राजद नेत्या राबडी देवी यांनी जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदींची तुलना त्यांनी ‘जल्लादा’शी केली. तर, ‘नाल्यातल्या किड्यासारखे’ जनता दलाचे काहीजण असल्याचे त्या म्हणाल्या.

मोदींना प्रियंका गांधींनी दुर्योधनाची उपमा दिल्यानंतर हे वक्तव्य राबडीदेवींनी केले आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना प्रियंका यांनी मोदींना दुर्योधन म्हटले ते चुकीचे केले, असे त्यांनी म्हटले. त्यांना यापेक्षा जल्लाद म्हणणे योग्य ठरेल. ते न्यायाधीश आणि पत्रकारांना मारून टाकणारे आणि कायमचे आयुष्यातून उठवणारे तसेच, गायब करून टाकणारे ‘जल्लाद’ आहेत. अशा माणसाचे मन आणि विचार किती भयंकर असतील, असे त्या म्हणाल्या.

याशिवाय, भाजप आणि जदयूवरही त्यांनी हल्ला चढवला. या पक्षांमधील लोक ‘नाल्यातील किडे’ आहेत. अशाच प्रकारची मोदींची भाषा आहे. भाजप आणि जदयूतले सगळेच नाल्यातील किडे आहेत. पाच वर्षांपूर्वी २०१४ मध्ये ते विकासाचे नाव सांगत आले होते. प्रत्यक्षात विनाश करून निघाले आहेत, असे त्या म्हणाल्या.

Leave a Comment