दाऊद भारताला द्या अशी भीक मागणाऱ्यांनी यापूर्वी आलेली संधी गमावली – प्रकाश आंबेडकर

prakash-ambedkar
मुंबई – आंबेडकर भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भारताकडे आत्मसमर्पण दाऊद अब्राहिम करण्यास तयार होता, पण ही संधी शरद पवार यांच्यामुळे हुकल्याचा गंभीर आरोप केला आहे. आता त्याच दाऊदसाठी भीक मागितली जाते आहे, पण भेटलेली संघी शरद पवारांनी गमावल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर शरद पवार यांनी याबाबत खुलासा करावा अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.

कुख्यात आरोपी दाऊद इब्राहिमला भारताच्या ताब्यात द्या अशी भीक मागणाऱ्यांनी यापूर्वी आलेली संधी गमावलेली आहे. ज्येष्ठ वकील राम जेठमलाणी यांनी यापूर्वी दाऊद समर्पण करायला तयार आहे आणि तो न्यायालयीन प्रक्रियेतदेखील सहभागी होऊ इच्छितो असा प्रस्ताव राष्ट्रवादीचे अध्यक्ष व तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना दिला होता, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.

पण या प्रस्तावाकडे शरद पवार यांनी कानाडोळा केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्याचबरोबर युपीए सरकार सुद्धा या निर्णयात सहभागी असल्याचे सांगण्यात आले होते, असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. दाऊद जर आत्मसमर्पण करायला तयार होता तर शरद पवार यांनी त्याचे आत्मसमर्पण करवून न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी का करुन घेतले नाही याचा खुलासा होणे आवश्यक असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

हे सर्व ज्यावेळी उघड झाले त्यावेळी केंद्रात नरेंद्र मोदींचे भाजप सरकार होते. मग त्यावेळी त्यांनी सुद्धा दाऊदला भारतात आणण्याचा प्रयत्न का केला नाही?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. तो प्रस्ताव शरद पवार यांनी का फेटाळला ? आणि कोणाच्या सांगण्यावरुन फेटाळला ? हे उघड झाल्यानंतर सध्याच्या भाजप सरकारने का प्रयत्न केले नाहीत याचा खुलासा कऱण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

Leave a Comment