नवी दिल्ली – पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या एरियल स्ट्राईकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह बालाकोट येथून खैबर पख्तून्वा येथे हलवले जात असल्याचे वृत्त काही उर्दू प्रसारमाध्यमांमध्ये दिले जात असल्याची माहिती एक व्हिडीओ ट्विट करुन गिलगिट येथील सामाजिक कार्यकर्ता सेनगे हसनैन सीरिंग यांनी दिली आहे. त्यांनी यामध्ये लिहिले आहे की, बालाकोट येथील एअर स्ट्राइकमध्ये २०० दहशतवादी मारले गेल्याची पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याने कबुली दिली आहे. यावेळी मुजाहिद म्हणून दहशतवाद्यांचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांना लढाईसाठी पाकिस्तान सरकारला पाठिंबा दिल्याबद्दल अल्लाहकडून विशेष सवलत मिळते.
#Pakistan military officer admits to "martyrdom" of more than 200 militants during Indian strike on #Balakot. Calls the terrorists Mujahid who receive special favors/ sustenance from Allah as they fight to support PAK government [against enemies]. Vows to support families pic.twitter.com/yzcCgCEbmu
— #SengeSering ས།ཚ། (@SengeHSering) March 13, 2019
एका वृत्तसंस्थेशी बातचीत करताना हसनैन यांनी सांगितले की, हा व्हिडीओ कितपत खऱा आहे याची मला खात्री नाही. पण जे काही बालाकोटमध्ये झाले पाकिस्तान त्याबद्दल काहीतरी लपवत आहे. घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याची परवानगी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना देण्यात आली नाही. वारंवार स्ट्राइक झाला मात्र त्यात आमच्या जंगलाचे आणि शेतजमिनीचे नुकसान झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पण यामुळे एवढ्या काळासाठी परिसरात प्रवेशबंदी करण्यामागे नेमके काय कारण आहे? घटनास्थळी भेट देऊन त्यांचे मत तयार करण्याचा अधिकार आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना दिला गेला पाहिजे.