अभिनंदन यांना भारताच्या स्वाधीन करणारी कोण होती ती महिला?

abhinandan-vardhman2
नवी दिल्ली : भारताचा ढाण्या वाघ, हवाई दलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याने पाकड्यांच्या एफ16 विमानाचा पाठलाग करुन ते जमीनीवर पाडले. त्यानंतर झालेल्या दुर्घटनेनंतर अभिनंदन यांनी पाकिस्तानाच्या लष्कराने आपल्या ताब्यात घेतले. पण भारताच्या कुटनितीनंतर पाकिस्तानने त्यांची सुटका केली. काल त्यांचे वाघा बॉर्डरवर जोरदार स्वागत करण्यात आले. भारतीय नागरिकांनी ढोल-ताशे, हार तुऱ्यांसह विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे जोरदार स्वागत केले. विंग कमांडर अभिनंदन यांची पिस्तुल पाकिस्तानी रेंजर्सने परत करत, त्यांना सन्मानाने भारतीय लष्कराच्या ताब्यात दिले. सीमेवर जवळपास 8 तासांची औपचारिकता पूर्ण करुन अभिनंदन भारतात परतले.

भारताच्या भूमीत अभिनंदन यांनी पहिले पाऊल ठेवले त्यावेळी त्यांच्यासोबत एक महिला अधिकारी होती. त्यावेळी सर्वांच्या मनात ही महिला कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. पण त्या पाकिस्तानमधील भारताच्या परराष्ट्र कार्यालयातील संचालक डॉ. फरिहा बुगती या होत्या. अभिनंदन यांच्यासोबत फरिहा या वाघा बॉर्डरवर आल्या आणि कागदोपत्री प्रक्रिया त्यांनी पूर्ण करुन अभिनंदन यांना बीएसएफ आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवले.

फरिहा यांच्यामार्फतच अभिनंदन यांना अटक झाल्यापासून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयासोबतचा सर्व संवाद पूर्ण झाला. त्याचबरोबर भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांचे प्रकरणही फरिहा या पाहत आहेत. सध्या कुलभूषण हे पाकिस्तानच्या तुरुंगात असून त्यांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरु आहे.

Leave a Comment