अण्णा हजारे यांच्या उपोषण या विषयावर बोलणे मी सोडून दिले आहे – शरद पवार

sharad-pawar
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे बैठक पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी अण्णा हजारे यांच्या उपोषण या विषयावर बोलणे आणि बातम्या वाचणे मी गेली दोन वर्षे सोडून दिल्याचे वक्तव्य केले आहे.

मी दोन ते तीन वर्षांपूर्वीच अण्णा हजारे यांच्याविषयी काही पाहणे आणि बोलायचे नाही असे ठरवले आहे. कुठलेही वृत्त त्यांच्याबद्दल छापून आले, तरी ते मी वाचत नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. त्यांनी पुढे बोलताना नरेंद्र मोदींसहित अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. अनेक पंतप्रधानांचे संसदेत आजवर लोकसभेच्या अखेरच्या सत्रातील भाषणे पाहिले आहे. संसदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारचे भाषण वाचनात आले. प्रथेला धरून त्यांचे भाषण नव्हते. त्यांच्यावर जसे संस्कार झाले, त्यानुसारच ते बोलले आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींवर निशाणा साधला.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील, अशी शक्यता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. ते यावर म्हणाले की, लोकसभेसोबत विधानसभा एकत्र झाली. तर महाराष्ट्रातील जनतेची सात महिने अगोदर सुटका होईल, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला. पक्षाने प्रियंका गांधी यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. त्याचा फायदा काँग्रेसला किती होईल, या प्रश्नावर शरद पवार यांनी भाष्य करणे टाळले. शिरुर आणि मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराबाबत काही चर्चा झाली आहे का? मध्यंतरी शिरुरमधून कोणी लढवण्यास इच्छुक नसल्यास मी उभा राहतो अशी घोषणा केली होती. त्या जागेबाबत काही चर्चा झाली का? त्या प्रश्नाबाबत शरद पवार म्हणाले की, शिरूरमधून अजित पवार यांनी लढायची आवश्यकता नाही. माझ्याकडे सहा प्रबळ दावेदार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment