मंडल आयोगाने केले वाटोळे : उदयनराजे

udyanraje-bhosale
सातारा : राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘मंडल आयोगामुळे सगळी वाट लागली असून आरक्षण आर्थिक निकषावरच दिले गेले पाहिजे, असे म्हणत मंडल आयोगावर टीका केली आहे. उदयनराजेंनी हे वक्तव्य धनगर समाजाच्या नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीत बोलताना केले आहे.

या बैठकीत उदयनराजे यांनी धनगर आरक्षणावरही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. पण दिले तर सगळ्यांना द्या अन्यथा कोणालाच आरक्षण देऊ नका. दरम्यान, महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात वेग पकडत आहे. मराठा आणि धनगर आरक्षणासाठी मोठ-मोठे मोर्चेही निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी थेट आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणाची मागणी करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

या बैठकीत उदयनराजे भोसले यांनी केलेल्या आणखी एका वक्तव्याची जोरदार चर्चा होता आहे. या जन्मात केलेली पापे येथेच फेडावी लागतात आणि म्हणूनच कॅन्सर, डायलेसीस सारख्या आजारांना सामोरे जावे लागते, असे खा. उदयनराजे म्हणाले आहेत. उदयनराजेंनी या वक्तव्यातून नक्की कुणाला टोला लगावला, याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.

Leave a Comment