नवी दिल्ली – अफगाणिस्तानच्या दिशेने रविवारी भारतातील गहू रवाना झाला असून हा गहू इराणच्या चाबहार बंदरमार्गे अफगाणिस्तानमध्ये दाखल होणार असून भारताने पहिल्यांदाच चाबहार बंदरचा वापर केला आहे. भारत- अफगाणिस्तान- इराण हे तिन्ही देश चाबहार बंदरामुळे जवळ आले आहेत.
भारतातील गहू चाबहार बंदरमार्गे अफगाणिस्तानच्या दिशेने रवाना
भारत आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या उपस्थितीत काल भारतातील गहू अफगाणिस्तानला रवाना झाला. हा सोहळा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडला. अफगाणिस्तानला भारतातील ११ लाख टन गहू रवाना झाला आहे. पहिला हा व्यापार पाकिस्तानमार्गे होत होता. पण आता अफगाणिस्तानात इराणमधील चाबहार बंदरमार्गे गहू पाठवण्यात येणार आहे. भारताला यापुढे पाकिस्तानला वळसा घालून अफगाणिस्तान आणि इराणशी संपर्क साधणे सहज शक्य होणार आहे. भारत अफगाणिस्तानमध्ये पुढील काही महिन्यांमध्ये लाखो टन गहू निर्यात करणार आहे. आम्ही दोन्ही देशांच्या विकासासाठी आणि जनहितासाठी कटीबद्ध आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.