भारतीय बाजारपेठेत २००० रूपयांच्या नोटांची कमतरता


नवी दिल्ली – भारतीय बाजारपेठेत गेल्या काही आठवड्यांपासून २००० रूपयांच्या नोटांची कमतरता भासत असल्याचे माध्यमांत वृत्त येत आहे. याबाबत ‘इकॉनॉमिक टाइम्स’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार यामुळे बँक आणि एटीएममध्ये पैसे भरण्याची सुविधा पुरवणाऱ्या कंपन्याही हैराण आहेत. २ हजार रूपयांच्या नोट गेल्या काही दिवसांपासून चलनातून कमी झाल्याचा बँक आणि एटीएम सेवा देणाऱ्या कंपन्यांनी दावा केला आहे. २ हजार रूपयांच्या नोटांचा रिझर्व्ह बँकही (आरबीआय) कमी पुरवठा करत असल्याचे वृत्त माध्यमांत आहे. २ हजार रूपयांच्या नोटांचा सरकार जाणूनबुजून कमी पुरवठा करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

५०० रूपयांच्या नोटांचा आरबीआयकडून मोठ्याप्रमाणात पुरवठा केला जात असल्याचे स्टेट बँकेचे सीओओ व्यास यांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला सांगितले. सध्या बाजारपेठेत सुरूवातीला पुरवण्यात आलेल्या २ हजारच्या नोटाच उपलब्ध असल्याचे व्यास यांनी म्हटले. देशात एकूण २.२ लाख एटीएम आहेत. त्यापैकी ५८ हजार एटीएम हे एसबीआयचे आहेत. एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. नोटबंदीनंतर ५०० आणि २००० रूपयांच्या नवा नोट देण्यासाठीची रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया एसबीआयने सर्वात वेगाने पूर्ण केली होती. पण बँकेला आता २ हजार रूपयांच्या नोटांच्या तुटवड्यामुळे एटीएममध्ये पैसे उपलब्ध करून देण्यात अडचणी येत आहेत. याबाबत आरबीआयला ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने इ-मेल पाठवून विचारले असता. त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळाले नाही.

Leave a Comment