दिल्लीने खेचून घेतला मुंबईचा आर्थिक राजधानीचा दर्जा

mumbai
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई शहराची ओळख, पण आता भारताची आर्थिक राजधानी मुंबई ही राहिली नाही. मुंबईचा हा दर्जा दिल्लीने खेचून घेतला आहे. ऑक्सफोर्ड इकॉनमिक्सने केलेल्या एका सर्वेमध्ये जगातील ५० मेट्रोपोलिन इकॉनमिक शहरांमध्ये दिल्लीला ३०वे स्थान मिळाले आहे. मुंबई या यादीत ३१ व्या स्थानी आहे.

सर्वेक्षणानुसार दिल्लीचा शहरी क्षेत्राचा विस्तार झाला आहे. गुडगाव, नोएडा, गाजियाबाद आणि फरीदाबाद या सारख्या शहरांसह दिल्ली-एनसीआरचा जीडीपी ३७० अरब डॉलर म्हणजेच २५१६४ अरब रुपये आहे. तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या मुंबईत नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, भिवंडी आणि पनवेल यांचा समावेश केला गेला आहे. शहरांचा संयुक्त जीडीपी ३६८ अरब डॉलर आहे. भविष्यात देखील दिल्लीच याबाबतीत पुढे असणार असे या रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे. जगात हे दोन्ही शहर आर्थिक केंद्र म्हणून लवकरच अजून प्रगती करतील असे म्हणण्यात आले आहे. २०३० मध्ये जगातील आर्थिक केंद्र असणाऱ्या शहरांच्या यादीत दिल्ली ११ व्या तर मुंबई १४ व्या स्थानावर असेल असे या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे.

Leave a Comment