मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मेट्रोचे तिकीट दर ८ जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश दिले असून दर ठरवण्यासाठी समिती स्थापन करण्यासाठी ३० जानेवारीपर्यंतची मुदत न्यायालयाने सरकारला दिली आहे.
आघाडी सरकारने मेट्रोचे दर अवाजवी असून त्यात बदल करण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दर ठरवण्यासाठी समिती स्थापण्याचे आदेश दिले आहेत.
पण अशी समिती स्थापन अजूनही झाली नाही. दरम्यान याबबात सरकारने लवकरात लवकर पावले उचलावीत असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी ७ जानेवारीला आहे.