अखेर कल्याणचा ‘तो’ तरुण भारतात परतला

aarif
मुंबई : इराकमधील दहशतवादी संघटना इसिसमध्ये सामील होण्यासाठी कल्याणमधील चार तरुण इराकला गेले होते. या चार तरुणांपैकी आरिफ माजिद हा त्यांच्या तावडीतून पळ काढण्यात यशस्वी झाला आणि तो तुर्कीमध्ये लपला होता. आता बातमी अशी आहे की इराकमध्ये अडकलेला आरिफ माजिद हा भारतात परतला असून सध्या तो केंद्रीय गुप्तचर विभागाच्या ताब्यात आहे. एटीएसचे अधिकारीही त्याची चौकशी करत आहे.

आरिफचा मृत्यू झाल्याची माहिती इराकमध्ये हल्ले सुरु झाल्यानंतर समोर आली होती. मात्र त्यानंतर लगेचच आरिफने आपल्या नातेवाईकांना फोन करुन मी इराकमध्ये नसून तुर्कीत असल्याची माहिती दिली.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन यासंदर्भातील माहिती आरिफच्या नातेवाईकांनी दिली. केंद्रीय गुप्तचर विभागाने आरिफला भारतात आणण्याचे काम केले. त्यानंतर तुर्कीमधूनच आरिफ आज सकाळी मुंबईत दाखल झाला. आता कल्याणमधील इतर तीन तरुणांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Leave a Comment