मेक इन इंडिया अभियानाला सायरस मिस्त्री, अंबानी उपस्थित राहणार

modi3
दिल्ली – येत्या गुरूवारी दिल्ली, मुंबई, बंगलोर आणि शेजारच्या १५० देशांत एकाचवेळी सुरू होत असलेल्या कम, मेक इन इंडिया अभियानानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लंचसाठी टाटा ग्रुप, अंबानी ग्रुप, महिंद्रा या देशांतील बड्या कंपन्यांबरोबरच अनेक विदेशी कंपनी प्रमुखांनी उपस्थित राहणार असल्याचे कळविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात या महत्त्वाकांक्षी अभियानाची घोषणा केली होती.

या निमित्त दिल्लीत होत असलेल्या कार्यक्रमाला टाटा ग्रुपचे अध्यक्ष सायरस मिस्त्री, मुकेश अंबानी, आदित्य बिर्ला, आनंद महिद्र, किरण शॉ मजुमदार, आयटीसीचे वाय.सी. देवेश्वर, एस्सारचे शशी रूईया यांच्याबरोबरच मर्सिडीज, एअरबस, व्होडाफोन, होंडा, सॅमसंग अशा अनेक विदेशी कंपन्यांचे प्रमुखही उपस्थिती लावणार आहेत. भारत जागतिक उत्पादन केंद्र बनला तर देशात प्रचंड प्रमाणात रोजगार निर्मितीस चालना मिळेलच पण व्यवसाय व आर्थिक विकासालाही त्याची मोठी मदत मिळणार आहे.

Leave a Comment