दुभंगली महायुती; रासप, शिवसंग्राम, स्वाभिमानी बाहेर

mahayuti
मुंबई – शिवसेना आणि भाजपातील भांडणाचा मोठा धक्का महायुतीला बसला असून महायुतीची तीन घटक पक्षांनी साथ सोडली आहे.

महायुतीतुन शेट्टींची स्वाभिमान शेतकरी संघटना, जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि मेटेंचा शिवसंग्राम संघटना बाहेर पडली आहे. शिवसेना आणि भाजपात समेट होणार असला तरी घटक पक्ष मात्र, नाराज झाले आहेत. महायुतीतून बाहेर पडण्याच्या निर्णायावर आम्ही ठाम असून, संध्याकाळी ६ वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी सांगीतले.

महायुतीत सामिल झाल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेची माफी मागतो असे म्हणत स्वाभिमान शेतकरी संघटना सदाभाऊ खोत महायुतीला राम राम ठोकला आहे. मोठ्या पक्षांनी धक्का मारुन बाहेर काढण्यापेक्षा आम्ही सन्मानाने आपला मार्ग निवडलेला बरा अशी प्रतिक्रिया खोत यांनी दिली. महायुतीत आम्हाला आपमानजनक वागणुक मिळाली. शिवसेना – भाजप नेत्यांनी आमचा केसाने गळा कापल्याचा आरोपही खोत यांनी केला आहे.

Leave a Comment