केवळ पाच रुपयात मेट्रोतून प्रवास;पण पाच दिवसच योजना

mumbai-metro
मुंबई – वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ही मेट्रो सेवा मुंबईकरांमध्ये हिट झाली असली जास्तीत जास्त प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मेट्रोने आठवड्यासाठी पण शनिवार -रविवार वगळून केवळ पाच रुपयात फेरफटका मारा ही विशेष ऑफर दिली आहे,

मेट्रो रेलला भरघोस प्रतिसाद मिळत असला तरी सकाळी गर्दीच्या वेळेस प्रवाशांचा प्रतिसाद कमी प्रमाणात पहायला मिळतो. यामुळे मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी मेट्रोने सकाळच्या वेळेत तिकीटाचे दर कमी केले आहेत.

सकाळी साडेपाच ते सकाळी आठ यावेळेत प्रवाशांकडून मेट्रो फक्त पाच रुपये तिकिट आकारणार आहे. घाटकोपर ते वर्सोवा पर्यंतचे तिकीट सध्या १० रुपये इतके आहे. आता हा घाटकोपर ते वर्सोवा पर्यंत फक्त पाच रुपये तिकिट आकारण्यात येणार आहे.उद्यापासून(गुरुवार) ही योजना लागू होणार आहे.

Leave a Comment