साहेबांचा मृत्यू … जनतेचा आक्रोश , मोदीच दिशा देतील – पंकजा मुंडे-पालवे

pankaja3
परळी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होणारा पंतप्रधान किती संवेदनशील असेल याबद्दल मला खात्री आहे. त्यामुळे साहेबांच्या मृत्यूसंबंधातील जनमानसात असणाऱ्या आक्रोशाला ते नक्की दिशा देतील असा विश्वास दिवंगत भाजपनेते व केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे – पालवे यांनी व्यक्त केला आहे. शिवाय साहेबांच्या मृत्यूच्या चौकशीचे भांडवल करू पाहणारयांना जनतेने थारा देवू नये तसेच संयम बाळगावा असे आवाहनही पंकजा यांनी केले आहे.

पंकजा मुंडे -पालवे यांनी म्हटले आहे कि दुःखी मनाचा आयुध म्हणून वापर करू नये. साहेबांच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीबाबत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते पक्षाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग आणि पक्षश्रेष्ठींशी बोलले आहेत.माझे बाबा आदरणीय मुंडे साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या व त्यांना गमावून सैरभैर झालेल्या लाखो लोकांना व कुटूंबाला धीर देण्याचे अतिशय कठीण शिवधनुष्य मी पेलवत आहे. साहेब हयात नाहीत ही कल्पनाच या निष्पाप प्रेम करणाऱ्यांना सहन होत नाही.तेव्हा साहेबांच्या मृत्यूच्या चौकशीचे भांडवल करू पाहणाऱ्यांना जनतेने निर्बल करावे, त्यांना बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Comment