मोदी आत्मकेंद्री ,देशाचा कारभार अशक्य – शरद पवार

मुंबई – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना पुन्हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘टार्गेट’ केले आहे. फेसबुकच्या पेजवर पवारांनी मोदींच्या कार्यपद्धतीला आक्षेप घेताना ती आत्मकेंद्री असल्याचे म्हटले आहे. 

पवारांनी म्हटले आहे की ,आत्मकेंद्री पद्धतीने देशाचा कारभार चालविता येणार नाही. देशासाठी धोरण ठरविताना ,योजना राबविताना सहकार्यांना विश्वासात घ्यावे लागते,शिवाय मंत्रिमंडळाची मान्यताही घ्यावी लागते. केंद्र शासनाच्या योजना असल्या तरी त्या राज्य सरकारेच अमलात आणत असतात त्यामुळे केंद्र सरकारला प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याबरोबर काम करावे लागते असेही पवारांनी म्हटले असून त्यासाठी स्वतः कृषीमंत्री म्हणून नितीशकुमार, नरेंद्र मोदी  यांच्या बैठका घेतल्याचेही त्यांनी फेसबुकच्या पेजवर दिलेल्या पोस्टवर म्हटले आहे. 

Leave a Comment