मुंबई – स्वतःचा पुतण्या सांभाळता येत नसेल तर आमचा काय दोष ? अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुकीच्या आखाड्यात आता आरोप -प्रत्यारोपांचे सत्र वाढले आहे.
लोकसभेतून राज्यसभेत का पळाला ? इथपासून ते बालका ,आधी निवडणूक लढव !मग बोल ,नाहीतर आयत्या पिठावर रेघोट्या … खंजीर कुणी खुपसले अशा शब्दप्रयोगांनी वातावरण पेटले आहे. जालना येथे मुंडे यांनी मतदानासाठी पाणी तोडण्याची भाषा करणाऱ्या अजित पवारांना लोकसभाच काय आगामी विधानसभा निवडणुकीत पाणी पाजू अशा शब्दात टीका केली नाही तोच अजित पवार यांनीही नांदगावमध्ये मुंडेना प्रत्युत्तर देताना तुमचा पुतण्या तुम्हाला सांभाळता आला नाही का ? मग त्याला दोष कुणाचा ?अशी तोफ डागली.