‘ताई ‘साठी दमबाजी ,’दादां’साठी सरसावले ‘साहेब’!

मुंबई –   पाणी नाही तर धरणात काय मुतायाचे?असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा मतांसाठी गावाचे पाणी तोडण्याची दमबाजी केल्याचा आरोप होत असला तरी सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी दक्षता घेणारे  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मात्र अजित पवारांसाठी सरसावले आहेत.त्यांनी हे आरोपच फेटाळून लावले आहेत. 

बारामती तालुक्यातील काही गावांत पाणीटंचाईचा प्रश्न भीषण आहे. निवडणूक प्रचार संपल्यानंतरही मासाळवाडी या गावामध्ये मतदारांना बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मतदान करण्यासाठी दौरा केला. तिथेही पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर दादांनी‘सुप्रिया सुळे यांना मतदान केलं नाही तर गावचं पाणी बंद करु. तुमचे दोन महिन्यात पाणीप्रश्न सोडवतो, आम्हालाच मतदान करा’ अशी दमदाटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याची तक्रार आहे. अजित पवारांच्या दमदाटीबाबत शरद पवार यांना प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता पवार चांगलेच भडकले. अजित पवारांवर आरोप खोटे आहेत अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही अजित पवारांची पाठराखण केली आहे. 

 

Leave a Comment