
मुंबई: गेल्या आठ ते दहा दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतक-याना मदत देण्यासंबंधी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रीस्तरीय शिष्टमंडळ भेट घेणार आहे. त्यामुळे आगामी काळात नुकसानग्रस्तं शेतक-यांना लवकरच मदत मिळेल असे वाटते.
राज्यावत होत असलेल्याे अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकर्यांीना मदत देण्यातसंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ मंत्र्यांची विशेष बैठक झाली. त्यामध्ये सध्याच्या निकषांपेक्षा जास्त मदत देण्याचा निर्णय या बैठकित घेण्यात आला. झालेले नुकसान पाहता, नेहमीच्या नुकसानाऐवजी हेक्टरी २५ हजार ते ५० हजार रुपये भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे.
