पंतप्रधान येताच सोनीयांनी घेतला काढता पाय

नवी दिल्ली: डागाळलेल्या मंत्र्यांना वाचवणा-या वटहुकुमावरून पंतप्रधान मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी यांच्यात काही तरी बिनसले आहे. जरी कॉग्रसमधून पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे दाखवल जात आहे. मात्र तरी बुधवारी महात्मान गांधी जंयतीनिमित्त झालेल्याय कार्यक्रमात कृतीमधून तसे दिसले नाही.

बुधवारी महात्मा गांधीजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग राजघाटावर आले. त्याठिकाणी पुर्वीपासून उपस्थित असलेल्या सोनिया गांधी यांनी मात्र पंतप्रधान सिंग त्याठिकाणी पोहचताच तिथून काढता पाय घेतला. सोनियांना बाहेर सोडण्यासाठी पंतप्रधानांच्या मागे असलेल्या कमलनाथ यांनीही धाव घेतली. मात्र त्यांची काही भेट झाली नाही.

मंगळवारीच पंतप्रधान मनामोहन सिंग अमेरिकेवरून परतले आहेत. त्यामुळे मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी यांची भेट घेतील असे सर्वांना वाटत होते. मात्र पंतप्रधान मनमोहन सिंह यांना सोनियांना साधा नमस्कारही करता आला नाही. त्यामुळे वटहुकुमाच्या मुद्द्यावरून गांधी परिवार आणि मनमोहन सिंह यांच्यात कटुता आल्याचे नाही म्हटले तरी त्यांच्या वागण्यातून दिसत आहे.

Leave a Comment