
दिल्ली – देशात अन्नधान्य साठवण्यासाठी पुरेशी पायाभूत सुविधा नसल्याने दरवर्षी 44 हजार कोटी रूपयांचे अन्नधान्य, फळे आणि भाज्या वाया जातात, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राज्यसभेत शुक्रवारी दिली. देशात प्रतिवर्षी 13 हजार 309 कोटी रूपयांची फळे व भाज्यांची नासाडी होते. तर तांदूळ, गहू, तृणधान्ये आणि इतर धान्ये असे मिळून 44 हजार कोटी रूपयांच्या धान्याची नासाडी होते, असे पवार यांनी सांगितले.
