अजित आणि शरद पवार पाणी चोर: शरद जोशी

धुळे: केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोठे पाणी चोर असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केला.

नर्मदा परिक्रमेला रवाना झालेले जोशी धुळे येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यानी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर कठोर टीका केली.

सध्या शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही दुष्काळावर रोज उठून विधाने करताना दिसतात. मात्र हे त्यांचे नक्राश्रू असून सर्वात मोठे पाणी चोर हेच आहेत; असा आरोप करून जोशी म्हणाले की; महाबळेश्वरच्या घाटात जमणारे पाणी याच नेत्यांनी आपल्या जिल्ह्यात नेले. पुणे जिल्ह्यातील एक इंचही जमीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोकळी सोडलेली नाही.

दुसऱ्या जिल्ह्यांचे पाणी पळविणार्या या नेत्यांकडून जनतेने काय अपेक्षा ठेवायची; असा उपरोधिक सवालही जोशी यांनी यावेळी केला.

Leave a Comment