पक्ष स्थापन करणार नाही ! : अण्णा हजारे

शिर्डी,२१ ऑगस्ट-भ्रष्टाचारविरोधी जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यास टाळाटाळ करणा-या केंद्रातील सत्तारुढ काँग्रेस पक्षावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा हल्लाबोल केला आहे. लोकपाल विधेयकाच्या प्रश्नावर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग देशातील जनतेला फसवत आहेत अशी कडक टीका त्यांनी केली आहे. दरम्यान पक्ष स्थापन करणार नाही व कधीही निवडणूक लढविणार नाही असे अण्णांनी जाहीर केल्याने पक्ष स्थापन करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या टीम अण्णाला त्यामुळे पुन्हा दणका बसला आहे.
गेल्या महिन्यात रामलीला मैदानावर अण्णांनी उपोषण केले. मात्र केंद्र सरकारने त्याची अजिबात दखल न घेतल्याने उपोषण अर्ध्यावर सोडून दयावे लागले. राळेगणला परतल्यावर पंधर दिवसांची विश्रांती घेतल्यावर अण्णांनी सोमवारी नवा ब्लॉग लिहून प्रसिद्ध केला आहे. या ब्लॉगमध्ये अण्णांनी केंद्रातील काँगेस पक्ष व पंतप्रधानांना लक्ष्य केले आहे.
मी कधीही निवडणूक लढविणार नाही व पक्षही स्थापन करणार नाही असे अण्णांनी याच ब्लॉगमधून आपली भूमिका स्पष्ट केल्याने त्याचा दणका टीम अण्णाला बसला आहे. कारण पक्ष स्थापन करुन निवडणूक लढविण्यासाठी उतावीळ झालेल्या टीम अण्णांचा पक्ष स्थापण्यासाठी अण्णा हजारे यांच्यावर दबाव वाढविला होता. मात्र अण्णांनी त्यास बळी न पडता आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
प्रत्येक राज्यात लोकायुत्त* बिल आणू, नागरिकांसाठी सनद, कनिष्ठ ते उच्च स्तरावरील सर्व कर्मचा-यांना लोकायुत्त*ाच्या कक्षेत आणले जाईल असे लेखी आश्वासन पंतप्रधांनांनी मला २७ ऑगष्ट २०११ रोजी रामलीला मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनावेळी पत्र पाठवून दिले होते. मात्र पंतप्रधानांनी हे आश्वासन पाळलेले नाही. लोकपाल विधेयकाच्या प्रश्नावर पंतप्रधान देशातील जनतेला फसवत आहेत अशी कडक टीका अण्णांनी आपल्या या ब्लॉगमध्ये केली आहे.
अण्णा म्हणतात, गेल्या ४२ वर्षांत आठवेळा लोकपाल बिल संसदेत मांडले गेले. यामध्ये ४० वर्षे काँग्रेसचेच सरकार सत्तेवर होते. परंतू हे बिल कधीही मंजूर झाले नाही. त्यांची इच्छाशत्त*ी नव्हती. भ्रष्टाचारामुळे सामान्यजण हैराण झाला असून त्यांना जीवन जगणे अवघड झाले आहे आणि संसदेत मांडलेले लोकपाल विधेयक हे सरकारी छापाचे असून भ्रष्टाचार रोखण्यास कुचकामी आहे. अशा विधेयकामुळे देशातील भ्रष्टाचार कधीही रोखला जाणार नाही.
केंद्र सरकारला लोकपाल विधेयक मंजूर करणे अवघड नाही. परमाणु विधेयक, राष्ट*पतींची निवडणूक या प्रश्नांसाठी जसे सहमतीचे प्रयत्न होतात. तसे प्रयत्न लोकपाल विधेयकाबाबत होतांना दिसत नाहीत अशी खंत अण्णांनी व्यत्त* केली आहे. शरीरात प्राण असेपर्यंत भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर मी लढत राहील. लोकपालाच्या मुददयावर जनजागृतीसाठी मी येत्या तीन महिन्यात देशाचा दौरा करेल व त्यात केंद्र सरकार लोकपाल विधेयकाच्या कसे विरोधी आहे हे पटवून देईल असे अण्णांनी यावेळी स्पष्ट केले. लोकपाल विधेयक मंजुर केले नाही तर जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही व त्याचा काळा डाग तुम्हाला कायम स्वरुपी लागेल असा इशारा अण्णांनी यावेळी दिला.

Leave a Comment